ब्रेकिंग न्यूज
Vishakha Raut यांचं नगरसेवक पद धोक्यात? | Thackeray Group News | News18 Marathi कुणालचा वडिलांसोबत वाद की दुसरंच कारण? खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम कापसावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव? असं करा रोगाच नियंत्रण, कृषी तज्ज्ञांनी दिला सल्ला, Video News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क…
SP News Maregaon

वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक गरिबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून, काढणीला आलेल्या फळबागा आणि साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी महसूल आणि कृषी विभागाला तातडीने आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी सायंकाळी वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेचे खांब वाकले आणि वीज वाहिन्या तुटल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे डाळिंब बागांसह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी साठवणुकीसाठी ताडपत्रीने झाकून ठेवलेल्या कांद्यावरील आच्छादने हवेत उडून गेल्याने कांदा भिजला असून, उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळाने मोठे नुकसान केले. त्यात खिर्डीगणेश येथे शब्बीर सांडू शेख यांच्या पोल्ट्रीचे शेड कोसळले. मढी बुद्रुकला सुनील बाबासाहेब चव्हाण यांच्या घरावरील पत्रे उडाले व भिंती पडल्या. बहादरपूरात काही झाडे व फांद्या तुटल्या, दोन कच्च्या घरांचे पत्रे उडाले. तळेगावमळेत मंदा मंजहारी वैद्य यांच्या घरावर आणि कांदा चाळीवर मोठे झाड कोसळले. वेस: भगवान नाना माळी यांच्या घराचे पत्रे उडून घरातील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही “बाधित शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. तसेच, मतदारसंघातील एकही बाधित शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या. पंचनामे करताना कोणताही दुजाभाव किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर