ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

राज्याच्या विकासकामासाठी दिल्लीत आलो होतो:जल जीवन मिशन, कांदो, साखर प्रश्नांवर बैठका झाल्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्यातील तिन्ही मुख्य नेते दिल्लीत एकाचवेळी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत असलेल्या शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील कांदा आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न असोत किंवा जलजीवन मिशनचे प्रलंबित प्रकल्प; राज्याचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही केंद्राकडे जाणार नाही तर कोणाकडे जाणार? जनतेच्या हितासाठी केंद्राशी संवाद साधण्यात आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही दोन दिवसांपासून दिल्लीत आहोत, त्याबाबत एवढा प्रश्न का पडला आहे? राज्यातील जनतेसाठी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी केंद्राकडे भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्यच आहे. अगोदरच्या सरकारला केंद्राशी बोलणे किंवा मदत मागणे कमीपणाचे वाटत असेल, पण आमची तशी भूमिका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रासाठी नेहमीच मदतीचा हात दिला असून राज्याच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी केंद्राकडून मिळाला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आणि विकासकामांवर लक्ष या दिल्ली दौऱ्यात प्रामुख्याने कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, ग्रामीण भागातील घराघरांत पाणी पोहोचवणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली. या सर्व बैठका अत्यंत सकारात्मक झाल्या असून केंद्राकडून या प्रश्नांवर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्राकडून मिळणारे हजारो कोटी रुपये राज्यासाठी आणायचे असतील, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर