ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

युवक काँग्रेसची ‘आवाज महाराष्ट्राचा’ मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व निकष मोडून मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेच्या कंत्राट वितरणात पारदर्शकता आणून ‘कचरामुक्त अमरावती’ संकल्पना साकार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांची क्षमता मर्यादित आहे. तेथील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आणि कालबाह्य झाल्या आहेत. खाजगी रुग्णालयांमधील उपचार गरिबांना परवडणारे नसल्याने, सरकारी रुग्णालयांमध्ये अद्ययावत व पुरेशा सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणीही युवक काँग्रेसच्या मोहिमेद्वारे केली जाणार आहे. शहराच्या पश्चिम व उत्तर भागातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या नवीन वस्त्यांमध्ये अद्याप रस्ते, वीज आणि सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. या भागांत पायाभूत सुविधा तातडीने पुरवण्याची मागणीही युवक काँग्रेसच्या मोहिमेचा एक भाग आहे. शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. यासाठी शहरात ‘हॉकर्स झोन’ची उभारणी करून रस्त्यावरील कोंडी फोडण्यात यावी. इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून रखडले आहे, तसेच राजकमल रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. हे बांधकाम त्वरित सुरू करून वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याची मागणीदेखील करण्यात आली. शहरातील काही तरुण नैराश्याकडे ढकलले जात आहेत, परिणामी गांजा, एम.डी. ड्रग्स आणि धारदार शस्त्रांची उघडपणे विक्री होत असून गुन्हेगारी वाढली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योगांना चालना देऊन तरुणांना रोजगार द्यावा आणि पोलीस प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपाशिवाय अवैध धंद्यांवर अंकुश लावून ‘भयमुक्त अमरावती’ तयार करावी, इत्यादी मागण्यासुद्धा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. ‘आवाज महाराष्ट्राचा-अमरावतीच्या परिवर्तनाचा’ या मोहिमेचा रितसर कार्यक्रम आगामी ३१ मे रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्थानिक समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन आंदोलनात्मक कृती निश्चित केली जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर