ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं, सदाभाऊ खोतांचा संताप:शेणा-मुतात हात घालू नका; गोवंश कायद्यावरून घणाघात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं असं वाटतंय. कदाचित त्यानंतर तरी सरकारला अक्कल येईल, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जनावरांवर होत असलेल्या कारवाईमुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, ते 350 किलोमीटरचा प्रवास करून थेट पंढरपूरमध्ये आले. कारण शेतकऱ्यांची जनावरं पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. माझा शेतकरी भोळा आहे. तो शेतीसाठी बैल खरेदी करतो, पण आता त्याची जनावरं जप्त करून कैद केली जात आहेत. हा अन्याय आहे, असं ते म्हणाले. गोवंश बंदी कायद्याच्या काही तरतुदींमुळे प्रत्यक्ष शेतकरीच अडचणीत सापडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंढरपूरमध्ये गोरक्षकांनी पकडलेल्या जनावरांची पाहणी करताना सदाभाऊ खोत अधिक आक्रमक झाले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांची जनावरं तुरुंगात गेली आहेत, असा दावा त्यांनी केला. जून महिन्यात पेरणी हंगाम सुरू होतो, त्याआधी मे महिन्यात शेतकरी शेतीची मशागत आणि तयारी करत असतो. त्यासाठी विविध बाजारातून बैल खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बीड जिल्ह्यातून सांगोला तालुक्यात आणलेल्या बैलांवर कारवाई झाल्याने शेतकरी चिंतेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारवर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी जातीय राजकारणाचाही मुद्दा उपस्थित केला. हिंदुस्थानात सत्ता जातीपातीतून मिळते, मातीतून नाही. सरकारला शेतकऱ्यांची मतं नकोत, त्यांना फक्त जातीपातीची मतं हवी आहेत, असा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या पारंपरिक व्यवहारात हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. शेणा-मुतात हात घालू नका, असा थेट दम त्यांनी सरकारला भरला. गोवंश बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून राजकारण तापण्याची शक्यता पशुपालन आणि जनावरांची खरेदी-विक्री हा हजारो वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय असल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांनी सरकारने वेगळ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, असा सल्ला दिला. दारू, गुटखा, अफू यांसारख्या गंभीर गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यायला हवं. मात्र, त्याऐवजी शेतकऱ्यांच्या जनावरांवर कारवाई केली जात आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोवंश बंदी कायद्याच्या अंमलबजावणीवरून आता राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर