ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही सरदेसाई यांनी केली आहे. वरुण सरदेसाई यांनी आपल्या पत्रात बीकेसीतील सार्वजनिक पार्कमध्ये सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. करदात्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या सुविधा जर सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसतील आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या वापरासाठीच ठेवल्या जात असतील, तर तो अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक जागेचं बंदिस्त स्वरूपात रूपांतर करून त्याचा वापर मर्यादित लोकांसाठी केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. निर्णय नेमका कोणी घेतला, याची माहिती सरकारने जनतेसमोर आणावी एमएमआरडीए आयुक्तांनी नेमक्या कोणत्या अधिकाराखाली या पार्कचा प्रवेश पूर्णपणे बंद केला, असा थेट सवालही वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या सुविधांचा लाभ करदात्यांनाच मिळत नसेल, तर या खर्चाचं औचित्य काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सार्वजनिक सुविधांचं रूपांतर अधिकाऱ्यांच्या बंदिस्त वसाहतीत करण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला, याची माहिती सरकारने जनतेसमोर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणात पारदर्शक चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर