ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

पत्नीला माहेरी सोडून 4 मुलांना विहिरीत ढकलले:नंतर बापानेही केली आत्महत्या, बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भयंकर घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका व्यक्तीने पत्नीला माहेरी सोडल्यानंतर 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची भयंकर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडली आहे. या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मुसा किराडिया असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्याने विहिरीत लोटलेल्या मुलांची नावे प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया व पियुष किराडिया अशी आहेत. विजय किराडिया हा भाले अंजन गावचा रहिवासी आहे. विजयचे आपल्या पत्नीशी भांडण झाले होते. त्यानंतर सोमवारी ती घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता. यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस? तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला. त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया यांनी आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरातील विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या भागातील स्थानिक नागरिकांना विहिरीत 5 मृतदेह तरंगताना आढळले. त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढून पुढील सोपस्कारासाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. एकाच कुटुंबातील 5 जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दारूच्या वादातून वडिलांची हत्या उल्लेखनीय बाब म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. अनिकेत समाधान घायवट (21) असे आरोपीचे नाव आहे. तर समाधान घायवट (44) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दारू पिण्याच्या कारणावरून हे हत्याकांड घडले. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांचा मृतदेह शेतातील लाकडांखाली लपवून ठेवला. त्यानंतर ती लाकडे पेटवून दिली. त्यानंतर पोलिसांत जाऊन वडील 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून अखेर तक्रारदार मुलाची चौकशी केली. त्यात त्याने आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर