ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

AI वापर काळाची गरज:प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण आवश्यक – जनरल उपेंद्र दिवेदी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर ही बदलत्या काळाची गरज आहे. जगात युद्धाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून उपलब्ध साधनसामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर करण्यास उपयोग होतो. तसेच अल्पावधीत निर्णय घेणे देखील सुलभ झाले आहे.प्रत्येक जवानाला ड्रोन उडवण्याची क्षमता विकसित करता आली पाहिजे. लढाईच्या मैदानात आता ड्रोन संख्या अधिक असणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. परिणामी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर लष्करात वाढवण्यावर भर दिला जात आहे असे मत चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र दिवेदी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जनरल उपेंद्र दिवेदी म्हणाले, एनडीए मध्ये पॅसिंग ऑफ परेड मध्ये आज एकूण ३५३ कॅडेट यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून यात १८ महिला कॅडेट यांचा समावेश आहे. तरुण कॅडेट हे देशसेवा करण्यासाठी सज्ज झाले आहे. चार्ली स्कॅडेन मध्ये जाऊन मला माझ्याकाळातील ऊर्जा पुन्हा मिळाली आहे. ऑपरेशन सिन्दुर हे यापुढे देखील सुरूच राहणार आहे. तिन्ही दलाचा समन्वय ठेवून पुढील युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्याचे दृष्टीने सक्षमता निर्माण केली जात आहे. विजय हा नेहमी लक्षात राहतो पण माहितीवर आधारित युद्ध परिस्थितीत विविध यंत्रणात समन्वय , विश्वास असणे महत्वाचे आहे.थिएटर कमांड पुढील दोन ते तीन वर्षात प्रत्यक्षात आपल्याला पहावयास मिळेल. पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मेक इन इंडिया अंतर्गत आत्मनिर्भर भारत संकल्पनांवर भर देण्यात येत आहे. संरक्षण उत्पादन देशात निर्माण केल्याने उद्योगांना देखील चालना मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर