ब्रेकिंग न्यूज
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
SP News Maregaon

गोवंश हत्या बंदी कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय:आमदार सदाभाऊ खोत यांचा महायुती सरकारला थेट इशारा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गाई, म्हशी, पाळणाऱ्या शेतकऱ्यांची मते नको सरकारला आहेत का ? सरकारला फक्त जाती पातीचीच मते हवी आहेत का ? गोवंश हत्या बंदी कायद्याच्या आधार घेऊन, काही लोक हे बाजार बंद पाडायला लागले आहेत. नेमकं यातून काय साध्य करायचं आहे हे सरकारने स्पष्ट करावे, गोवंश हत्या कायदा आता गोपालक हत्या कायदा झालाय , हे तुम्हाला महागात पडेल, गोठ्यात हात घालू नका, गोरक्षकांना शेतकरी वैतागला आहे, शेणा मुतातले हात रस्त्यावर लढायला मागे पुढे बघणार नाहीत, असा इशारा आ. सदाभाऊ खोत यांनी दिला. शिरभावी ( ता. सांगोला ) येथील शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातून खरेदी करून वाहनातून आणलेले बैल पंढरपूरच्या गो रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. तसेच त्या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पंढरपूर, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांतून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या ताब्यात चारा, पाण्याशिवाय असलेल्या जनावरांची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि सरकारवर कडक ताशेरे ओढले. यावेळी पुढे बोलताना आ. खोत म्हणाले कि, शेतकरी पिढ्यान पिढ्या जनावरे पाळतो, आम्हाला जेवढी गरज आहे तेवढी जनावरे गोठ्यात ठेवतो, आणि गरज नसेल ती विकतो. सरकारला जनावरे सांभाळायची एवढी हौस आली आहे तर सरकारने गावात येऊन जनावरे खरेदी करावी, शेतकऱ्याने जनावरे विकायची नाहीत तर जनावरे खरेदी विक्रीसाठी दुकाने टाकावीत, सरकारच्या आश्रयाशिवाय हे चालते का, सरकार हे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या बाजूने आहे. या सरकार समोर मी हात टेकले, हतबल झालोय, या सरकारला कळत नाही. सरकारला शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र का कळत नाही, असा सवाल व्यक्त केले. मी आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे, पांडुरंगाला साकडे घालणार आहे, पांडुरंग, दह्या, दुधाने भरलेला आमचा गोठा संकटात आलेला आहे, आता तूच सरकारला सुबुद्धी दे असे पांडुरंगाला साकडे घालणार आहे. सरकारला सुबुद्धी दे, पांडुरंगाला साकडे

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर