जय मल्हार बहुउद्देशीय संस्था, दारव्हा यांच्या वतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, प्रेरणादायी उपक्रमांनी सजलेला हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप पुनसे महाराज होते. प्रमुख अतिथी म्हणून दारव्हा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील चिरडे, अनंतरावजी कोरडे, वैशाली मासाळ, प्रमोद मेटांगे, प्रशांत मासाळ, सुखदेवराव नवरंगे, निकेश उघडे, काजळे साहेब, मनोहरराव थोटे, मुकेश महाराज चुडे, बाबारावज महानर, गंधे, कचरे उपस्थित होते.अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवनियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा सन्मान करण्यात आला.याशिवाय दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्रावण दाढे, सचिव सुधाकर काळे, उपाध्यक्ष विलासराव कापडे, सहसचिव वंदेवराव कापडे, कोषाध्यक्ष संतोष शेंडगे, सुनील फुसांडे, ओंकार गोरडे, विनोद गंधे, डाखोरे, प्रल्हादराव कचरे, प्रकाशराव उघडे, विठ्ठलराव करडे यांनी परिश्रम घेतले. संचालन सुधाकर काळे, ऋषिकेश कचरे यांनी केले.