नवे शैक्षणिक सत्र लवकरच सुरू होणार असून, जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, अनुदानीत अशा २४१७ शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ७९ ३८१ विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. सध्या ११ लाख २२, ७३२ पुस्तके पुस्तके पोहोचली असून, काही उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्याच्या आधी पोहोचतील, अशी माहिती शिक्षण विभागाद्वारे देण्यात आली आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ५ लाख १८ हजार ८४९ तसेच सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ६ लाख ३ हजार ८८३ पुस्तकांचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले. राज्य शासनाच्या योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पुस्तके वितरित केली जातात. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ सुरू होण्यास केवळ एका आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने उर्वरित पुस्तकेही लवकरच जिल्ह्याच्या शिक्षण विभागाकडे पोहोचणार आहेत. शाळांनी पुस्तक वितरणाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांद्वा रे देण्यात आले आहे. …आतापर्यंत ७५ टक्के पुस्तके दाखल झाली जिल्ह्यात मागणीनुसार आतापर्यंत ७५ टक्के पुस्तके पोहोचली असून उर्वरित पुस्तके येत्या काही दिवसांत मिळतील. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पुस्तके मिळणार आहे. कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी पात्र शाळांकडून इयत्तानिहाय विद्यार्थ्यांची संख्या मागवण्यात आली आहे. त्यानुसार शाळांना पुस्तके मिळणार आहेत.