ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

अंगणवाड्यांना 300 दिवस पोषण आहार द्या:‘टेक होम रेशन’चे बालहक्क संरक्षण आयोगाचे निर्देश : अंमलबजावणी सुरु‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अंगणवाड्यांमधील बालकांना ३०० दिवस पोषण आहार देणे अनिवार्य असल्यामुळे ‘टेक होम रेशन’ योजना उन्हाळ्यात राबवण्यात आली. यामुळे कडाक्याच्या उन्हात बालकांना अंगणवाड्यांमध्ये येण्याची आवश्यकता नाही. तर त्यांच्या घरीच पोषण आहार पोहोचवण्याची सोय करण्यात आली आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने अंगणवाड्यांना एक महिना सुटी देण्याचे निर्देश दिले. त्याचवेळी केंद्र शासनाच्या बालकांना ३०० दिवस पोषण आहार देण्याच्या नियमांचे पालनही करायचे होते. त्यामुळे पालक व स्वमर्जीने उन्हाळी सुटीत जे बालक अंगणवाडीत आले त्यांना तेथे तसेच ज्यांना अंगणवाडीत येता आले नाही त्यांच्या घरी पोषण आहार पोहोचवण्यात आला. जिल्ह्यात एकूण २५९२ अंगणवाड्या असून येथे सुमारे १ लाखा बालक प्राथमिक धडे घेत आहेत. प्रचंड उकाडा व उष्ण वातावरणात बालकांना अंगणवाडीत बोलावणे योग्य नसल्याने सकाळी ८ ते १० पर्यंतच अंगणवाडी सुरू ठेवली जात आहे. या कालावधीत केवळ बालकांचे मनोरंजन होईल, असे हलके शिक्षण दिले जात आहे. बालकांचे पोषण थांबू नये यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे. कारण, अंगणवाड्यांमध्ये येणारी बहुतांश बालकं ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील असतात. त्यांना दररोज पोषक आहार मिळणे आवश्यक आहे. पोषक अन्नाशिवाय बालकांच्या शारीरिक व मानसिक वाढीत कोणतीही अडचण येऊ नये या उद्देशाने राज्य शासनाने पोषण आहार देण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी सुटीतही घरपोच आहार देण्याची व्यवस्था ^महिन्यातून २५ दिवस तसेच वर्षभरात अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देणे अनिवार्य आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत बालकांच्या घरी पोषण आहार पोहोचवला जातो. एवढेच नव्हे तर जे बालक अंगणवाडीत येतात त्यांना तेथे पोषण आहार दिला जातो. – विलास मरसाळे, उपकार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर