ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

पेरणीसाठी दमदार पावसाची गरज; शेतकरी बांधव प्रतिक्षेत:अधूनमधून पावसाची हजेरी, मात्र पेरणीसाठी ओल नाही‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी अद्याप पेरणीयोग्य दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सर्वत्र समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक राहिल्याने जमिनी मोठ्या प्रमाणात तापल्या आहेत. मागील काही दिवसांत पाऊस पडूनही जमिनीच्या आतपर्यंत आवश्यक ओल पोहोचलेली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीचा निर्णय घेतलेला नाही. एक-दोन वेळा झालेल्या पावसामुळे वरवर ओल निर्माण झाली असली, तरी पेरणीसाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नाही. यंदा अवकाळी पावसाने तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात चांगली हजेरी लावली होती. काही ठिकाणी नाल्यांनाही पाणी आले होते. मात्र त्याचवेळी कडक उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने पडलेले पावसाचे पाणी लवकर आटून गेले. पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतरही हीच परिस्थिती कायम असून, पडणाऱ्या पावसाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून पडत असला तरी तो समाधानकारक नसल्याने बहुतांश शेतकरी अजूनही पेरणीपासून दूर आहेत. काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली असली तरी त्यांच्याही मनात चिंता वाढली आहे. कारण उगवलेल्या बियांना पुढील काही दिवसांत पुरेसा पाऊस न मिळाल्यास तीव्र उष्णतेमुळे रोपे करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या भरोशावर काही शेतकऱ्यांनी टोबणी पेरणी केली होती. त्या बिया आता अंकुरित होऊ लागल्या आहेत. मात्र पुढील चार-पाच दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर तीव्र तापमानामुळे ही कोवळी रोपे वाचवणे कठीण होईल. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर