ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

उबाठाला राऊत नावाची कीड लागली,बाजूला केली नाही तर नुकसान वाढणारच:शिवराळ भाषा सर्वांना येते, पण ती कुठे वापरावी हे राऊतांना समजत नाही- नीलेश राणे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवराळ भाषा सर्वांना येत असते पण ती कुठे वापरली पाहिजे हे समजले पाहिजे. उबाठाला संजय राऊत नावाची कीड लागली आहे. उद्धव ठाकरे ही कीड जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हे नुकसान अजून वाढत जाणार आहे. लोकं स्वत:हून आमच्याकडे येत असतील आणि त्यांच्यासाठी राऊत ही भाषा वापरत असतील तर उद्धव ठाकरेंचे नुकसान करत आहेत की फायदा हे त्यांनी ठरवले पाहिजे, असे शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी म्हटले आहे. नीलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून चांगले बोलण्याची काय अपेक्षा ठेवणार आहोत. ज्यांनी काही स्वत: कमावलेले असते त्यांना वाटते की आपण लोकांना जवळ करावे, लोकांना परत बोलवावे. यांनी स्वत: काहीही कमावलेले नाही त्यामुळे यांना वाटते की सर्वांनी जावे आणि माझ्याच हातात सर्व काही असावे. शिवसेना यांनी कुठेच उभी केली नाही, त्यांनी कोणत्याही ठिकाणी संघटनात्मक बांधणी केली नाही किंवा निवडणूक सुद्धा लढवली नाही.
राऊत शिवसेनेचे कधीच नव्हते नीलेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांना राज्यसभा मिळते तिथे त आरामात बसतात. शिवसेना म्हणजे संघर्षांचे दुसरे नाव आहे. जेव्हा संघटना वाढत होती त्यावेळी संजय राऊत कुठे होते. शिवसेना राहिली काय अन् संपली काय, उद्धव ठाकरे राहिले काय नाही राहिले तरी संजय राऊत राहिले पाहिजे आणि त्याचसाठी राऊत काम करतात त्यातूनच ते अशी भाषा वापरतात, ही काय भाषा आहे का? ते जनतेमधून निवडून तर येत नाही. राज्यसभेची त्यांची दुसरी किंवा तिसरी टर्म असेल त्यांना लोकांना शिव्या देत काय साध्य करायचे आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना मदत होईल की नुकसान होईल याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. उद्धव ठाकरेंवर मी काही बोलू शकत नाही ते काय बोलणार यावर मी काही बोलू शकत नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर