ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव येथे फटका‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव आदी परिसरातील केळी बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. काढणीसाठी तयार असलेल्या केळीच्या झाडांवर वादळी वाऱ्याने कहर केला. अनेक झाडे उन्मळून पडली तर काही झाडे मधोमध मोडून जमिनीवर कोसळली. यामुळे कापणीयोग्य मालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने तसेच बँकेचे कर्ज काढून केळीची लागवड केली होती. मात्र, एका रात्रीत संपूर्ण मेहनत वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी अध्यक्ष अनोख रहाणे, गजानन डाफे, विकास देशमुख, हरिभाऊ पायघन, मुकुंद अकोटकर, अभि नवले, बाळूभाऊ अकोटकर, अनिल रोकडे, राजूभाऊ बोचे, संतोष भारसाकळे, गणेश भारसाकळे, प्रदीप हुत्के, रामदास अस्वार, राजूभाऊ भुसकट, प्रवीण बेलोकार, गोपाल अकोटकर, दीपक अस्वार, अनिकेत बोचे, रवींद्र जायले, आशिष झापे, गजानन जवंजाळ, निलेश बाहाकर, चेतन झापे, गजानन बाहाकर, अंकुश झापे, शेतकरी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच पणज मंडळ परिसरातील नुकसानग्रस्त भागात अद्याप कोणताही शासकीय अधिकारी किंवा विमा कंपनीचा प्रतिनिधी पाहणीसाठी आले नसल्याची खंत व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर