ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

बोरगाव मंजू परिसरात खरिपाच्या पेरण्या रखडल्या:शेतकऱ्यांचा जीव टांगणीला, पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बोरगाव मंजू व परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेत आटोपून ठेवली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. चालू हंगामातील मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने परिसरातील १०० टक्के क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गत दोन दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने पावसाचे चक्र बदलले असून, दरवर्षी पावसाला विलंब होत आहे. यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी पैशांची जुळवाजुळव केली. महागडे बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी करून शेतकरी सज्ज झाले आहेत, परंतु जून महिना अर्धा अधिक संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. परिसरातील शेतजमीन प्रामुख्याने काळी आणि बरड अशा दोन भागांत विभागलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा कूपनलिकेची सोय आहे, त्यांनी अल्प प्रमाणात कपाशीची कोरडी लागवड केली आहे. मात्र, सध्या भूजल पातळी कमालीची खालावली असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस लांबला, तर या बागायतदार शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी केवळ पहिल्याच ओल्या पावसावर पेरणीची घाई करू नये. पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय बियाणे टोबू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. दरवर्षी उशिरा येणाऱ्या पावसामुळे या पिकांचे हातचे उत्पादन जाते, असा अनुभव आहे. यावर्षीही पाऊस लांबल्याने मूग व उडदाचा पेरा लक्षणीयरीत्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. मूग, उडीद पिकांना फटका बोरगाव मंजू परिसरात सोयाबीन आणि कपाशी या पिकांचा पेरा सर्वाधिक असतो. याशिवाय तूर, मूग, उडीद, ज्वारी आणि भाजीपाल्याचे उत्पादनही घेतले जाते. मात्र, पाऊस लांबल्याचा थेट फटका मूग आणि उडीद या नगदी पिकांच्या पेरणीला बसताना दिसत आहे. ७५ मिमी पावसानंतर पेरणी ^सलग तीन ते चार दिवस ७५ किंवा १०० मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. खंडीत पावसाच्या शक्यतेमुळे कमी कलावधीच्या वाणांची पेरणी करावी. सरी ओरंबा पद्धतीने पेरणी करावी. पावसाचा खंड पडल्यास पाणी द्यावे. – प्रवीण भोर, तालुका कृषी अधिकारी.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर