राजेराय मठात प्रवच‌न, भारुडासह अखंड हरिनाम सप्ताह:विविध स्पर्धांची रेलचेल, अक्कलकोटमध्ये सद्गुरु बेलानाथ महाराजांचा 23 वा पुण्यतिथी उत्सव‎

येथील श्री स्वामी समर्थ राजेरायमठ सद्गुरु बेलानाथ महाराजांचा २३ वा पुण्यतिथी उत्सव दि. ९ जून ते १७ जून दरम्यान भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने सप्ताहभर अखंड नाम विना सप्ताह, धर्म संकीर्तन तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहयोगाने भाऊ राऊत, संगीताताई शेजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज श्री साई सच्चरित ग्रंथाच्या पारायण आणि सायंकाळी ४ पासून प्रवचन, कीर्तन, भारुड, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच दररोज संध्याकाळी ७ ते १० दरम्यान व्यंकटेश संगीत विद्यालय सोलापूर, स्वरधास्त संगीत विद्यालय सोलापूर, गुरुकुंज आश्रम मोझरीचे सचिन महाराज भुरले, डॉ. अतुल थोरो (कोल्हापूर), सप्तसूर पुणे, वंदना मांडवकर, माधवी देसाई (पुणे) व मिलिंद चव्हाण यांच्या वतीने भावगीत, भक्तिगीत, प्रवचन आणि कीर्तन आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. दि. २० मे ते १४ पर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरिता छंद कलाशिक्षक अतुल जाधव व बेला चेस अकॅडेमीचे नमित झिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य उत्सव दि. १६ जून रोजी सकाळी ६ वाजता मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके, पार्वती अम्मा जयदेव, शैला अनंतराज, विनय कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत श्रींची पूजा करून सुरू झाला. सकाळी १० वाजता डॉ. बालाजी गाजूल, ज्योती झिपरे, सुजाता दोडके, शैलेश मुळे, विजयकुमार गाजुल, ज्ञानेश्वर गाजूल यांच्या उपस्थितीत सामुदायिक अभिषेक करण्यात आला. या रॅलीमध्ये वयोवृद्ध व्यक्तीपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत दोनशे जणांनी सहभाग नोंदवून गावात वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिक कचरा, ध्वनी प्रदूषण इत्यादीवर प्रबोधन करीत फेरी काढली. दि. १४ जून रोजी बेला फाउंडेशनच्या सहकार्याने सकाळी चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन अभिजीत मुळे व हिमाणी मुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटातील व्यक्तीपर्यंत जवळपास दीडशे स्पर्धक सहभागी झाले होते. सर्व विजेत्यांना सुमन झिपरे, निलाताई सामंत, सरोजाताई सामंत, लीनाताई सामंत, उषा साठे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. सायंकाळी ५ वाजता मठ परिसरात पालखी प्रदक्षिणा झाली. त्यानंतर सहा वाजता बिरलिंगेश्वर ढोल पथक मादन हिप्परगा, चीट हलगी पथक (दक्षिण सोलापूर), न्यू दावलं बँड पथक अक्कलकोट, जय हनुमान भजनी मंडळ हसापूर, संत ज्ञानेश्वर वारकरी भजनी मंडळ (श्रीरामपूर) व भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये राजेराय मठापासून गावातून रथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी भक्तगणांच्या वतीने जागोजागी रथाची आरती करून स्वागत करण्यात आले. उत्सवाची सांगता दि. १७ जून रोजी बेला समर्थ महिला भजनी मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आली. सामाजिक अन् सांस्कृतिक उपक्रम उत्साहात साजरे गाजूल यांच्या उपस्थितीत सामुदायिक अभिषेक

Leave a Comment

error: Content is protected !!