ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

50 हजार रोपे पडून:11 हजार हेक्टर वनक्षेत्र संकटामध्ये; 3 वर्षांपासून वृक्षलागवड निधी नाही, कन्नडला वन विभागाच्या 850 हेक्टरवर अतिक्रमण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील ११ हजार हेक्टर विस्तीर्ण वनक्षेत्राची प्रादेशिक वन विभागाकडे आहे. मात्र, तीन वर्षांपासून शासनाकडून वृक्षलागवडीसाठी निधीच उपलब्ध झालेला नसल्याने जंगलांचे संवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. तसेच दोन वाटिकांमध्ये ५० हजार रोपे तयार असून, त्याला मागणी नसल्याने ही झाडे तशीच पडून आहे. त्यात विभागाच्या ८५० हेक्टरवर अतिक्रमण असून, अपुऱ्या मनुष्यबळामुळे या विभागाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कन्नड प्रादेशिक वन विभागाकडे १०० हून अधिक गावांना लागून असलेले ११ हजार हेक्टर क्षेत्र येते. या विभागाच्या अखत्यारीत नवीन वृक्षारोपण करणे, संकटातील वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन करणे, वन्यजीवांच्या हल्ल्यात बाधित शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, तसेच अवैध वृक्षतोड रोखणे आणि वन गुन्हेगारांवर कारवाई करणे अशा जबाबदाऱ्या आहे. मात्र, सध्या हा विभाग निधी टंचाई आणि अपुऱ्या मनुष्यबळाच्या दुहेरी संकटात सापडला आहे. वन विभागाने तीन रोपवाटिकांमध्ये ५० हजार झाडे तयार केली आहेत. मनुष्यबळ कमतरता पिशोर, कळंकी, जामडी आणि वडाळी येथे मागील काळात माती नाला बांध व वनतळे तयार केले आहेत, जेथे सध्या वन्य प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, वणवा आणि अवैध वृक्षतोडीचे मोठे संकट कायम आहे. चालू वर्षात ७१ ठिकाणी अवैध वृक्षतोड झाली असून अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, वेगवेगळ्या ११ वनपरिक्षेत्रांत भडकलेल्या वणव्यामुळे ६० हेक्टरवरील जंगल खाक झाले असून ३१ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सहाय्यक वनसंरक्षक विशाल कवडे यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून निधी बंद असल्यामुळे वृक्ष लागवड ठप्प आहे. कन्नड, मक्रणपूर आणि जामडी येथील तीन रोपवाटिकांमध्ये ५० हजार विविध वृक्षांची रोपे तयार ठेवली आहेत. ६ वखारींवर वन विभागाचे नियंत्रण असून, शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या त्रासापोटी २५ लाख रुपयांपेक्षा अधिक भरपाई दिली आहे. शासनाने निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. Ãक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी केवळ ५ वनपाल, १८ वनरक्षक, १ लेखापाल, १ कार्यालयीन वनरक्षक , १६ वनमजूर कार्यरत आहे. एका वनरक्षकाला ५०० ते १००० हेक्टरचे रक्षण करावे लागत आहे. – शिवाजी टोंपे, प्रादेशिक अधिकारी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर