ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पैठण तालुक्यात 17 % खरिपाची पेरणी:कापूस, तूर, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पैठण मान्सूनचे आगमन होऊन जवळपास महिना होत आला आहे, तरीही पैठण तालुक्यात अद्याप पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. जून महिना संपत आला तरी अनेक गावांमधील शिवारे कोरडीठाक आहेत. अशा परिस्थितीतही तालुक्यातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी मोठा धोका पत्करत खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे १७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली. दरम्यान, सिंचनाची सोय नसलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी मात्र अद्याप पेरणीला प्रारंभ केलेला नसून, ते दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पैठण तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि बाजरी ही प्रमुख खरीप पिके घेतली जातात. गोदावरी नदीच्या पट्ट्यातील काही भागांत विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर शेतकऱ्यांनी कपाशी व तुरीची पेरणी उरकून घेतली आहे. आजवर तालुक्यात ६०० हेक्टरच्या जवळपास ही पूर्वमोसमी पेरणी झाली आहे. सध्या तालुक्यातील सर्वच शिवारांमध्ये उन्हाळी मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. हवामान विभागाने मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. आगामी १५ दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना गती मिळेल. अन्यथा पेरणीचे नियोजन, पीक निवड आणि उत्पादनाचा अंदाज यावर परिणाम होऊ शकतो, असे कृषी अधिकारी विकास पाटील यांनी स्पष्ट केले. एक चांगला पाऊस झाला की शिवार हिरवेगार होईल, अशी आशा शेतकरी बाबासाहेब मगरे यांनी व्यक्त केली आहे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी १५ जुलैपर्यंतचा कालावधी अद्यापही अनुकूल मानला जातो. त्यामुळे पुढील दोन ते तीन आठवड्यांत चांगला पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्या वेगाने पूर्ण होऊ शकतात. उशिरा पेरणी झाल्याने उत्पादनात मोठी घट होईल असे चित्र सध्या तरी नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर