ब्रेकिंग न्यूज
Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार
SP News Maregaon

मुलांची मैदाने बिल्डरांच्या घशात घालणार का?:शिंदे-फडणवीस भागीदारीत ‘हॉटेल’ संस्कृती? 30 टक्के जागा बिल्डरांना देण्याच्या निर्णयावर राऊतांचा संताप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईसह महाराष्ट्रातील खेळण्याची मैदानातील 30 ते 40 टक्के जागा बिल्डरांना देण्यात येणार आहे. हॉटेल्स, क्लब, मॉल्स निर्माण करत त्यामधून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरणार. मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदाने खाण्याची वेळ आली का तुमच्यावर? काय करताय देवेंद्र फडणवीस असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.मुलांच्या मैदानावर डोळा ठेवता आहात? काय सुरू आहे राज्यात? राज ठाकरेंच्या घरासमोर? बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांच्या स्मारकासमोर तुम्ही हॉटेल्स बांधणार का? असा सवाल राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे काय ठाण्यातील भागीदाराला शिवतीर्थ, आझाद मैदानावर 30 टक्के जागा हॉटेल्ससाठी देणार आहात का? एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भागीदारी करत हॉटेल्स बांधणार आहेत का? असा सवाल राऊतांनी केला आहे. यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, नाहीतर उद्या पालकांना आणि मुलांना मैदाने वाचवण्यासाठी आंदोलन करावे लागेल. उद्योगांसाठी नक्षली संपवले का? संजय राऊत म्हणाले की, विदर्भामध्ये ज्या पद्धतीने खान उद्योगाने त्रास देणं सुरू केले आहे. येटापल्ली तालुक्यातील अनेक जण माझ्याकडे आले त्यांनी मला तिथली परिस्थिती सांगितली. पाण्याचे झरे, तलाव यामध्ये खनीज मिश्रीत पाणी जातंय त्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. चिखलात अडकून 7 गोमातांचा मृत्यू झाला. हे सर्व करणारी कंपनी जसे काही भाजपची भागीदार आहे असे वागत असल्याचे मला स्थानिकांनी सांगितले. शेतीचे मोठे नुकसान होत आहे, प्रशासन विकले गेले असल्याने खानींच्या मालकांविरोधात तक्रारी घेण्यास कुणी तयार नाही. या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ मोठ्या देणग्या दिल्या आहेत आणि इतर लोकं त्यांच्या पेरोलवर आहे. कंपनीची परवानगी रद्द करा. उद्योगाच्या नावाने झाडे तोडली जात आहेत. नक्षलवाद संपवला म्हणात तो काय खान उद्योगाला मोकळे रान देण्यासाठी संपवला की जनतेसाठी? असा सवाल राऊत यांनी केला आहे. उद्योगांकडून देणग्या घेऊ नका संजय राऊत म्हणाले की, नक्षलवाद्यांचा त्रास हा जनतेला त्रास देणाऱ्याच उद्योगांना होता. त्यांचे आणि या लोकांचे भांडण होते. देवेंद्र फडणवीसांना सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर शेतजमीनी संपवणारे, पाणी खराब करणारे उद्योग बंद करावे. कठोर भूमिका घ्या. जनतेला वाचवा एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा अपमान संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की अखाती युद्धांचा परिणाम भारतावर होणार नाही. इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होऊ शकले नाही याचे खापर 35 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या अखाती देशातील युद्धावर फोडत आहे, याचा अर्थ ते मोदींचा अपमान करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर