मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील:- करणवाडी ते शिबला रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणर कामाला त्वरीत सुरूवात करण्यासाठीआज दिनांक 5 मे 2022 रोज गुरुवार पासून अफजल खान युसुफ खान पठाण यांनी मारेगांव येथील तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
करणवाडी, नवरगांव,सगणापुर, म्हेसदोडका, रोहपट, व झरी तालुक्यातील शिबला, येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे.त्या मुळे अनेक छोठे मोठे अपघात झाले आहे. आणि त्या मार्गाने ये- जा करणाऱ्या दुचाकीस्वारांना मनक्याचे आजारात कमालीची वाढ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण होवून सुद्धा यावर प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.
व त्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. हे वास्तव्य आहे रस्त्यांनी वाहने तर सोडा पण पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्याच प्रमाणे नवरगाव पासून जवळच असलेल्या पुलावरील मोठ मोठे खड्डे पडले असुन पुलाच्या बांधकामाच्या सळाखी बाहेर निघाल्या आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिल्याची माहिती आहे. पण त्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. अखेर ग्रामस्थांनी निवेदने देऊनही प्रशासना कडून दखल घेण्यात आली नाही.
त्या मुळे आज दिनांक 5 मे पासुन मारेगांव येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आले आहे.रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसा पासुन लढा देत आहे.

अफजल पठाण यांनी गेल्या 8 एप्रिल रोजी या रस्त्याच्या मागणीसाठी महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागासह आदींना निवेदन पाठवण्यात आले होते.तसेच रस्त्याचे काम चालू न केल्यास 5 मे पासून आपण आमरण उपोषण करू असा इशाराही निवेदनाद्वारे अफजल पठाण यांनी दिला होता.मात्र प्रशासनाने निवेदनाची कुठलीच दखल न घेतल्याने 5 मे पासुन येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहे.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मारोती गौरकर, जि.प.सदस्य अनिल देरकर, माजी सरपंच अरुण नक्षणे, संदीप आस्वले सह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणास आपला पाठींबा दर्शविला….
