ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

शिक्षकाने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वेतनातून 20 हजार रु. कपातीचे दिले गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मागील 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने वर्धा नदीला महापूर येवुन हजारो हेक्टर शेती पीके खरडून गेली, तर अनेकांच्या घराची गावात पाणी शिरुन पडझड झाल्याने अस्मानी संकटाचा सामना करण्यास हतबल झालेल्या शेतकरी शेतमजुरांना, सामाजिक भान जपत एका संवेदनशील प्राथमिक शिक्षकाने मदतीचा हात पुढे करत त्यांच्या वेतनातून 20 हजार रुपये पुरग्रस्तांना देण्यात यावे असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

तालुक्यासह राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असुन मागील 20 दिवसांपासून धो धो पाऊस कोसळत आहे.त्यामुळे तालुक्यातील जिवन दायीनी ठरणारी वर्धा, निरगुडा नदी तथा नाल्यांना महापूर येवुन  शेतकरी अस्मानी, व शासनाकडुन मदत जाहीर झाली नसल्याने व फक्त आश्वासीतच केल्याने सुलतानी संकटात सापडला आहे.

शासनाकडुन ठोस मदत मिळेल या आशेवर असणाऱ्या बळीराजाची आर्थिक घुसमट होत असतानांच तालुक्यातील जळका येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मानवतावादी संवेदनशील शिक्षक “सुभाष मोतीराम केराम” यांनी त्यांच्या माहे जुलैच्या वेतनामधुन, शिक्षण विभागाला पत्र देऊन 20 हजार रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात यावे अशी पत्राद्वारे विनंती केली आहे.


विद्यार्थ्यी घडवण्याचे सत्कार्य करत असतानाच पुरग्रस्तांना मदतीचा हात देत समाजासमोर आदर्श  निर्माण करणाऱ्या या शिक्षकांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर