Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अजितदादा यांची पुरग्रस्त शेतकऱ्यांना भावनिक साथ.

मारेगाव तालुक्यातील दापोरा चिंचमंडळ शेतशिवाराची पाहणी शेतकऱ्याशी साधला थेट संवाद.

तालुक्यातील राजकीय नेत्यांची लोकप्रतिनिधींची उपस्थिती.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव :तालुक्याला पूर्ण पुरस्थितीचा चांगलाच फटका बसला असुन,अतिवृष्टी, बेंबळा, वर्धा प्रकल्पाची दारे उघडल्याने उद्भवलेली पूर्ण पुरस्थितीने शेती, व गावे यांना प्रचंड हानी पोहचली असुन शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. येथिल मुख्य व्यवसाय शेती असुन यावरच जगण्याचा स्रोत शेती असुन अतिवृष्टीच्या पुरपरस्थितीने सर्वच हिरावून नेल्यामुळे विदारक परस्थिती येथे उद्भवली असुन शेती खरडून गेली पिकांची हानी झाली आहे.

या संपूर्ण परस्थितीचा आढावा घेण्याकरिता विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार मारेगाव तालुक्यातील दापोरा चिंचमंडळ येथे परस्थितीची पाहणी केली शेतकऱ्याशी थेट संवाद साधुन समस्या जाणून घेतल्या भावनिक साथ दिली. आपल्यावर आलेल्या संकटाचा विधानभवनात आवाज उठवेल.जगाचा पोशिंद्या बळीराज्यावर आलेल्या परस्थितीवर अद्याप सरकारी निर्णय व्हायला पाहिजे होता. एवढी मोठी हानी झाली असुन तात्काळ निर्णय महत्वाचा होता.

बेंबळा प्रकल्प,वर्धा प्रकल्पची सर्व दारे उघडल्याने पुर परस्थिती निर्माण झाली असुन वारंवार असे झाल्यास शेतकरी देशोधडीला लागणार असुन संपुर्ण परस्थितीचा आढावा घेतांना बेंबळा आणि वर्धा प्रकल्पच्या कोणत्याही पूर्वसूचना न देता दारे उघडल्याने नाराजी व्यक्त केली.याप्रसंगी शेतकऱ्यांनी, सरपंच्यांनी, निवेदन दिली. प्रशासकीय अधिकारी,राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!