Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळण महत्वाचा,दीपक रंगारी.

मारेगाव येथील गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

भाषा लेखन करतांना तसेच भाषेचा इतरत्र वापर करतांना प्रमाणभाषा आणि बोलीभाषेमधील फरक कळणे महत्वाचे आहे असे उद्गार मराठी दीपक रंगारी यांनी काढले. ते दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला मारेगाव येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश खुराणा होते. तर उदघाटक म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की,दुसरे मार्गदर्शक म्हणून मा.सुनयना येवतकर, महिला जिल्हाधक्ष महात्मा ज्योतिबा फुले समता परिषद यवतमाळ, प्रमुख अतिथी म्हणून गौरीशंकर खुराणा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव,

जनार्दन खंडेराव पोलीस निरीक्षक मारेगाव, भास्कर धानफुले माजी प्राचार्य, बाजार समिती संचालक यादवराव काळे, खडसे, प्रफुल विखणकर, सरपंच रविराज चंदनखेडे, जनहित कल्याण संघटना मारेगावचे अध्यक्ष समीर कुळमेथे, उपाध्यक्ष रॉयल सय्यद, महिला अध्यक्ष कविताताई मडावी, सचिव सुवर्णाताई खामणकर,रवी पोटे,प्रमोद लोणारे,तुळशीराम कुमरे,अंकुश माफूर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना दीपक रंगारी म्हणाले की,शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुले लिखानामध्ये नेहमीच समोर राहिलेले आहे.आपण अनेकदा शब्द एक वाचतो आणि दुसराच लिहितो.मराठी व्याकरणमधील बारकावे समझून घेणेही फार महत्वाचे आहे.अचूक शब्द लिहिताना अनेक लोकांकडून मोठया प्रमाणात चुका होतात असे सांगतांना त्यांनी गुणगौरवसाठी आलेल्या 10 वी आणि 12 वीच्या मुलांचा क्लासच घ्यायला सुरुवात केली.त्यांना ऱ्हस्व, दीर्घ आणि व्याकरनाचे नियम यावर प्रकाश टाकत भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी सुनयना येवतकर यांनीही महिलांनी सबलीकरणाचे धडे घ्यावे, पुरातन रूढी तसेच परंपरेच्या मागे न लागता पुरोगामी पद्धतीने जीवन जगावे असे सांगितले.तसेच अन्याय व अत्याचार कधीच सहन करू नये.जशास तसेच उत्तर देण्यास महिलांनी तत्पर असले पाहिजे असे सांगितले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मोमेन्टो आणि संविधानाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत,प्रास्ताविक सुमित गेडाम तर आभार सुरेश नाखले यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील 43 शाळांचे विद्यार्थी,पालक शिक्षक आणि मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरोगामी पत्रकार संघाचे मोरेश्वर ठाकरे,सुमित हेपट,गजानन देवाळकर,आनंद नक्षणे,धनराज खंडरे,सुरेश पाचभाई,गजानन आसूटकर,भैय्या कनाके,शरद खापणे,प्रफुल ठाकरे यांनी सहकार्य केले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!