अतिवृष्टीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली. सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.आधीच शेतकऱ्याला दुबार-तीबार पेरणीची वेळ आली होती.

तालुक्यातील नाल्याकाठच्या व इतरही बहुतांश शेतातील पीक पाण्याखाली होते ज्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतातील पीक हे लहान असल्याने व त्यात पाणी साचून राहल्याने ते पीक सुद्धा मेले होते.अतिवृष्टीने शेतातील पिकांचे सतत नुकसान होत गेले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित मदत जमा करा.

अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदनातून देण्यात आला आहे.यावर्षी सततच्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतामध्ये वारंवार पेरणी करूनही हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हतबल व हावदिल झालेला आहे. अति पावसाने उत्पन्नात मोठया प्रमाणावर घट होणार आहे.

देशाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो अशी भीतीही व्यक्ती केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी आपले जीवनही संपविले आहे. प्रशासन निद्रावस्थेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होतं आहे.शेतकऱ्यांसाठी असलेली ही मदत 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

अन्यथा शेतकऱ्यांसोबत मारेगाव येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पचारे,तालुका अध्यक्ष भारत मत्ते, तालुका उपाध्यक्ष दयाल रोगे, रायुकाचे नितीन गोडे, शहराध्यक्ष मुन्ना शेख, नगरसेवक हेमंत नरांजे, अमोल मत्ते, अतुल पचारे, सुनील आत्राम, आशिष येरणे, महेश पाटील, गोलू पालकर, अभिजित जुमडे, रोहित कोसरे, शुभम ठावरी, तन्वीर शेख, विवेक बोकडे, संतोष बल्की यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!