ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

अहेरअल्ली जवळील तो अरुंद बोगदा ठरताहेत अपघातप्रवण स्थळ.

124 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सदोष रस्ता तयार करण्यासाठी सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालून जाणाऱ्या बोगद्यामुळे अनेक अपघात होत आहे.पावसाळ्यात पाणी व चिखल साचत असल्याने लोकांना तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाणे त्रासदायक ठरत आहे.तसेच रेल्वे पूला खालून येणारे व जाणारे दोन्ही बाजूकडील वाहन जावे अशी व्यवस्था रेल्वे प्रशासनाने दुसरा पूल उभारून करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहेर अल्ली येथील रेल्वे पूला खालूल जाणारा रेल्वे बोगदा एकदम अरुंद खोलगट तिरकस असल्यामुळे दोन्ही बाजूने येणारे लहान मोठे वाहने एकमेकांना दिसत नाही.राष्ट्रीय मार्ग क्र. ७ जोडण्यात आल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.११ नोव्हेंबर रोजी धानोरा येथील रामदास तुडमवार नामक इसमाचा याच पुलाखाली बसच्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या तुडमवार यांच्या कुंटुबीयांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी.

त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये नोकरी द्यावी.अहेर अल्लीचे सरपंच यांनी या पुलाबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करून ही कारवाई करण्यात न आल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात सरपंच संघटना सह ग्रामवासीयांत प्रचंड रोष आहे.

तसेच येथे वाहतुकीसाठी दुसऱ्या बोगद्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.सर्व मागण्यांचे निराकरण १५ दिवसात न केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तहसीलदारांना निवेदनातून देण्यात आला. यावेळी सरपंच संदीप बुरेवार, नीलेश येल्टीवार, हितेश राऊत, राहुल दांडेकर संतोष,हरिदास गुर्जलवार,रमेश रोडावार,शंकर आकुलवार,इत्यादींनी दिला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर