लग्न समारंभात व्यत्यय.
मिरचीसह मुंग,भुईमुंग पिकांची नासाडी.
उन्हाळी मशागतीची कामे ठप्प.
तालुका प्रतिनिधी :- झरी जामणी.
ज्ञानेश्वर आवारी [8805979173]
झरी जामणी आज संध्याकाळी ४ वाजेच्या दरम्यान अचानक ढग दाटून आले आणि पाऊस बरसला.या पावसामुळे जामणी लगतच्या नाल्याला चांगलाच पूर आला.पुलावरून पाणी वाहत असल्याने झरी – घोन्सा , मुकूटबन कडे जाणारी वाहतूक १ तास ठप्प झाली.
जिल्ह्यात आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊसही कोसळत आहे दिनांक २५ एप्रिलपासून सगळीकडे ढग दाटून आले की पावसाळ्या प्रमाणे धोधो पाऊस बरसत असून या रोजच्या पावसाने नदी नाल्याना पूर येत आहे.
आपल्याकडे अनेक जन उन्हाळ्यात लग्न समारंभ उरकतात कारण उन्हाळा लग्न कार्यसाठी मोकळा ऋतू समजला जातो . पण गेल्या दोन तीन वर्षांत कोरोणा व लाँकडाऊनमुळे लग्न समारंभ आटोपती घ्यावी लागले.पण वर्षी जेमतेम मनमोकळे पणाने समारंभ साजरे करण्याला सुरुवात झाली मात्र ऐण उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झाला असल्याने आयोजकांची तारांबळ उडाली आहे.

ग्रामीण भागात लग्न,रिसेप्शनचे साठी घरी व शेतात मंडप घातले जाते परंतु लग्नसराईत पावसाने एंट्री केली असून मंडप वादळी वाऱ्या पावसाने उडून जात असल्याने आयोजकांना चांगली धावपळ करावी लागते आहे.यात जेवणाची खाण्याची मोठी नासाडी होत असून आलेल्या पाहुण्याची गौरसोय होत आहे.वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत पाणी पुरवठा बंद होत असल्याने गावातील लग्न समारंभाच्या आनंदला अवकळी पाऊस अडसर ठरत आहे.
हा अवकाळी पाऊस उन्हाळी पिकासाठी घातक ठरला आहे . तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली आता शेवटचा तोडा चालू आहे.पावसाने मिरची निट वाळत नसून काळी पडते आहे.त्यामुळे मल ची प्रतवारी खराब होवून दरकमी मिळत असल्याने त्यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.काढणीस आलेला उन्हाळी मुंग ,भुईमुंग पिकाची गारपीठ व पावसान नासाडी झाली आहे.
उन्हाळी हंगामासाठी केलेली मेहनत व खर्च वाया गेला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .सततच्या पावसाने उन्हाळ्यातील नागरण व वखरण ही मशागतीची कामे खोळंबली आहे .
