Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

आसान्या फाउंडेशन द्वारा बुद्ध जयंती निमित्त भव्य खिरदान कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ प्रतिनिधी

‘अंधार नष्ट करावयाचा असेल तर स्वतःमध्ये असलेल्या उजेडालाच आवाहन आणि आव्हान करावे लागेल त्यालाच आपण अत्त दीप भव असे म्हणतो’. जगाला शांती संयम, सत्य आणि अहिंसेचा अनमोल संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या मंगलदिनी आसान्या फाउंडेशन व असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज इंडिया एपीईआई यवतमाळच्या वतीने संविधान चौक यवतमाळ येथे भव्य खिरदान वाटप कार्यक्रम करण्यात आला.

सर्वप्रथम महाकारूणीक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीजवळ मेणबत्ती प्रज्वलन  आणि पंचांग प्रणाम करून भव्य खिरदान वाटपाला सुरुवात झाली या कार्यक्रमातून दुहेरी उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्याचा मौलिक संदेश फलकांवर लिहिलेल्या  सुविचारांच्या माध्यमातून देण्यात आला.

आसान्या फाउंडेशन चा लोगो असलेली रांगोळी नयन पाटील यांनी काढली. कार्यक्रमाला डॉक्टर किशोर बनसोड आणि माननीय सुनील मालके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले ,यावेळी उपस्थित मान्यवरांमधे माननीय भीमराव घनमोडे, बनसोड साहेब बनसोड मॅडम, डॉ. निलेश उके, वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास कांबळे, धीरज भाऊ वाणी, स्मिताताई उके, माधुरी ताई वाळके,



डॉ.स्नेहल दिघाडे डॉ.निकिता, चैताली सुमेध भिमटे कल्पनाताई घनमोडे डॉ. उत्कर्ष मोहोड, नितेश मेश्राम, अमोल मेश्राम, अमित पाटील ,संदीप भुरके ,चेतन नेवारे, विजय देवकते, चिराग पाटील सक्षम भिमटे, राजकुमार सुखदेवे सुनील मानवटकर, निखिल बनसोड , रेश्मा ठोमणे, श्रेया गजभिये, सिमरन ठमके ,रवीना सवाईकर यांनी पुढाकार घेतला. श्री नितीन पाटील व मृणालिनी दहीकर  यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेऊन, कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन, नियोजन  केले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!