Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

बुरांडा (ख) ग्रा.प.चा अजब कारभार

वार्ड 3 चा रस्ता चिखलात,पायदळ चालने कठीण

वार्डातील महिला व पुरुषाकडून रोष व्यक्त,सिमेंट रोड करण्याची मागणी

आरोग्य विभागाच्या पी.एच.सी.ला जाण्यासाठी रस्ताच नाही

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख)ग्राम पंचायत वार्ड क्र.3 मधील जवळपास 400 मीटरचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला. याच वार्डात आरोग्य विभागाच्या नवीन पी.एच. सी. चे बांधकाम करण्यात आले आहे.पण या दवाखान्यापर्यंत जायला रस्ता मात्र ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला नाही.दरवर्षी या वार्डातील रहिवाशांना चिखलाचा हा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु अनेकदा गावकऱ्यांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत कडून दखल घेतली गेली नाही ही शोकांकित आहे.

बुरांडा (ख) येथील वार्ड क्र.3 मधील पहिली गल्ली महेंद्र कवाडे यांचे घरापासून ते बुरांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत जवळपास 200 मीटरचा आणि दुसऱ्या गल्लीमध्ये मडावी यांच्या घराजवळून तर नविन प्राथमिक आरोग्य केंद्र बुरांडा पर्यंत जवळपास 200 मीटरच्या संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.

बुरांडा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 3 ही नवीन वस्ती निर्माण झाल्याला अंदाजे 12 ते 15 वर्ष झाले.पण अजून पर्यंत या वार्डात साधा रस्ता सुद्धा ग्रामपंचायत कडून तयार करण्यात आला नाही किंवा मुरूम टाकून पर्यायी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही.त्यामुळे तेथील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे.


तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात घरासमोर साचलेल्या पाण्यातून आणि एक ते दीड फूट चिखलातून प्रवास करावा लागत आहे.एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला रस्त्यापर्यंत उचलून आणावे लागत आहे.साधी मोटर सायकल सुद्धा वार्ड नंबर 3 मध्ये जात नाही ही शोकांकित आहे.

आता पावसाळा सुरू असल्याने अतिशय चिखल झाले असून रहिवाशांना आपल्या घरापर्यंत ये-जा करणे कठीण झाले आहे.दुचाकी व इतर वाहन घरां पर्यंत नेता येत नाही.वयोवृद्ध व शाळकरी मुलांना यांचा अतिशय त्रास होत असून शेतकऱ्यांना रासायनिक खते व जीवनावश्यक वस्तू घरापर्यंत कसे न्यावे हा प्रश्न पडला आहे.


गेल्या अनेक वर्षापासून येथील रहिवासी हा त्रास सहन करत असून येथील रहिवाशांना पावसाळा नकोसा होऊन जातो आहे.
चुकीच्या ग्रामपंचायतच्या नियोजनाने येथील नागरिकांना पावसाळ्यात डेंगू,मलेरिया यासारखा आजार होण्याची शक्यता नाकरता येत नाही.

या गलत कारभारामुळे विशेषतः महीलां व पुरुषाकडून रोष व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर उपयोजना करण्याची मागणी सहील/दीपक आनंद ताकसांडे,अमोल अशोक सातपुते,पुष्पा कार्तिक उईके,ऋषी मुंकीदा मोहीतकार,सुनिता विठ्ठल सुर्तेकर,मंदा दिलीप गाडगे,जया सुधाकर सूर्तेकर,अमृता मधुकर सूर्तेकर,सारीका शंकर सोनटक्के, दादाराव महादेव आत्राम,तानेबाई रामभाऊ मेश्राम,

रामभाऊ चिन्नू मेश्राम,देविदास कवडू आत्राम,सुगंधा देविदास आत्राम ,सिमा अशोक मडावी,शुभांगी महादेव मेसेकार,रामदास शामराव मेसेकार, मंगला रामकिसन ढेगळे,अनिकेत रामकिसन ढेगळे, योगेश मोहन गुंजेकार,मोहन बापुराव गुंजेकार,अशोक भगवान सातपुते,गिरजा महादेव सोयाम,नवनीत महादेव सोयाम,अंकिता रुपेश दुधकोवडे,देवानंद कडू ताकसांडे, मयूर देवानंद ताकसांडे दामू राऊत,

गौराबाई नेहारे,कार्तिक उईके,अवी गाडगे, महेंद्र कवाडे,शेषराज कांबळे नारायण शेंडे,विजय सिडाम,सुधाकर सूर्तेकार, सोमेश्वर मडावी, अलका मडावी,करण शेंडे, गजानन वामन गुलगुंडे, गीता गजानन गुलगुंडे रहिवाशांनी केली आहे .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!