Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ठरावाला बगल देऊन बाहेरील व्यक्तीची नेमणूक

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत होतोय घोळ

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत खापरी येथे सुरू असलेल्या सौर प्रकल्पाकरिता लागणारे मनुष्यबळ हे खापरी येथीलच किंवा सगनापूर पेसा गट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतर्गतच घेण्यात यावे असे ठरलेले असतानाही  बाहेरील मजूर घेत असल्याचा प्रकार मौजा खापरी येथील सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये सुरु असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.

मारेगाव तालुक्यातील मौजा खापरी येथे मुख्यमंत्री सौर प्रकल्प सुरू आहे.या प्रकल्पा अंतर्गत येथे कुशल किंवा अकुशल कामगार घेण्यात येणार ते सगनापूर पेसा गट ग्रामपंचायत अंतर्गतच घेण्यात यावे अशा प्रकारचा ठराव जागा उपलब्ध करून देत असताना घेण्यात आला.याच अटीवर ग्रामपंचायतने हा ठराव वीज नियामक मंडळाला दिला.या प्रकल्पाला लागणारे मजूर किंवा कामगार हे खापरी या गावातीलच घेण्यात यावे अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख या ठरावामध्ये आहे.

ज्या अटी आणि शर्तीवर ग्रामपंचायतने ही जागा सौर प्रकल्पासाठी दिली त्या सौर प्रकल्पाच्या कामांमध्ये आता बाहेरील मजुरांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे गावात प्रकल्प असताना गावातील नागरिकांना या प्रकल्पामध्ये काम मिळत नसल्याने गावात बेरोजगारीचे वातावरण पसरलेले आहे.त्यामुळे या सौर प्रकल्पांमध्ये असलेले बाहेरील मजूर कमी करून खापरी येथीलच मजूर घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

सगणापूर पेसा गट ग्रामपंचायत अंतर्गत खापरी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम सुरू आहे.सदर काम ठरावाला बगल देऊन बाहेरील व्यक्तींना कामावर घेऊन जर काम केले जात असेल तर लवकरच ग्रामसभा घेतली जाईल आणि सदर ठराव रद्द करण्याबाबत संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
श्री.दादाराव कपलुजी टेकाम,सरपंच गट – ग्रामपंचायत कार्यालय सगणापूर

0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!