काँग्रेसच्या विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपला सत्तेचा माज आला असून, सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि त्या पैशातून आमदारांची खरेदी, असा नवा ‘आयाम’ आणि अमित शहांचा ट्रेंड भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे,” अशा शब्दांत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर बोलताना पटोले म्हणाले, “भाजप लोकशाही आणि संविधान मानायला तयार नाही. कुणाला पैशांचे तर कुणाला पदाचे प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा अमित शाह यांच्यापासून सुरू झालेला हा ‘ट्रेंड’ आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे. प्रज्ञा सातव यांना भाजपने नेमके काय प्रलोभन दिले, हे लवकरच समोर येईलच, पण ही घटना चुकीची आहे.” काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर? प्रज्ञा सातव यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक विधान परिषद आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पटोले यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या नीतीवर बोट ठेवले. “काँग्रेस आपले नेते सांभाळू शकत नाही, अशी टीका भाजप करत आहे, पण हे त्यांच्या सत्तेच्या माजापोटी येत असलेले बोल आहेत,” असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. भारत काँग्रेसमुक्त करताना भाजप काँग्रेसयुक्त केली काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील त्या काळात काँग्रेसमुक्त भारत करण्याचा प्रण घेतला होता. पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केली. त्यामुळे काँग्रेस कधी संपू शकत नाही. उद्या आम्ही सत्तेत आलो, तर भाजप पूर्ण खाली होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदावरून सुनावले प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हव्या असणाऱ्या विरोधीपक्ष नेते पदावर परिणाम होणार आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, भाजपला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नव्हते. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि सोडवायचे ही लोकशाहीतील व्यवस्था आहे. पण भाजपला लोकशाही आणि संविधान मान्य नाही. यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील विरोधीपक्ष नेत्याशिवाय चालले. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात विरोधकांचे दोन खासदार असताना विरोधीपक्ष नेतेपद दिले होते. लोकशाहीत सत्तेची आणि विरोधकाची अशी दोन चाके असतात. ही परंपरा भाजपने मोडकळीस काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा प्रश्न नसतो. काँग्रेसने विरोधकांचे दोन आमदार असताना सुद्धा विरोधीपक्ष नेते पद दिले होते. त्यामुळे काँग्रेसने ठेवलेली लोकशाहीची जाण भाजपकडे नाही. त्यामुळे एक आमदार कमी झाला किंवा जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
काँग्रेसमुक्त भारत करताना भाजप काँग्रेसयुक्त झाली:सत्तेतून आमदार खरेदीचा अमित शहांचा ट्रेंड महाराष्ट्रातही, नाना पटोलेंचा घणाघात
-
By सुरेश पाचभाई
- December 18, 2025
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
विमान दुर्घटनेला शरद पवारांनी अपघात का म्हटले?:भास्कर...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री:देवेंद्र...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य:ब्लॅक बॉक्स जळाला म्हटल्यावर...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत दिवंगत अजित पवारांचा...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 23, 2026
