ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

महापौर रितू तावडेंच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल:किशोरी पेडणेकर म्हणाल्या- प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागतेय; सुषमा अंधारेंचाही टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात संतापाची लाट उसळली असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील निशाणा साधला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, महापौर रितू तावडे यांना प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागत आहे. असे नेहमीच का होत आहे? सध्या अशोक खरातमुळे वातावरण गरम असताना रितू तावडे मुनींसमोरच तुमच्यामुळे माझा घसा बरा झाला, असे म्हणाल्या. ॐ च्या उच्चारात प्राणायाम आहे. आपण एकदा प्राणायाम सुरू केला की ठीक व्हायला 2 वर्षे लागत नाहीत. आपल्या स्वरनलिकेवर दाब येऊन घर्षण होऊन आजार बरा होतो. मी त्या गुरुजींचा आदर करते पण आपण एकदा काही बोलतो त्याला सारवा सारव करावी लागू नये, असे म्हणत पेडणेकर यांनी तावडेंचे कान टोचले आहेत. सुषमा अंधारेंचा टोला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट करत रितू तावडे यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले आहे. अंधारे म्हणाल्या, राजकारणातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी अत्यंत जबाबदारीने वागलं बोलल पाहिजे कारण त्यांचा वर्तनव्यवहार हा सामान्य जनतेसाठी पथदर्शी असतो. रितूजी तुमच्या श्रद्धेचा आदरच मात्र समस्त मुंबईकरांच्या घशाची काळजी घेण्यासाठी मुंबईकरांना स्वच्छ पाणीपुरवठा आणि शुद्ध हवेची जास्त गरज आहे. तुमची महापौरपदी निवड सुद्धा नेमकी याच कामासाठी झाली आहे हे तुम्हाला आठवत असेलच, असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे. …तर अजून एक खरात जन्माला येईल- संदीप देशपांडे मनसे नेते संदीप देशपांडे यांना रितू तावडे यांच्या विधानावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, चांगले आहे. असे आशीर्वादाने गळे बरे होत असतील तर अजून एक खरात जन्माला येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने रितू तावडे महापौर- मंत्री लोढा दरम्यान, गुरुजींच्या आशीर्वादाने रितू तावडे महापौर झाल्याचे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. ते म्हणाले, गुरुदेवजींची भेट घेतल्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादामुळे रितू तावडे मुंबईच्या महापौर होऊ शकल्या, असे वक्तव्य लोढा यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर