संजूबाबा राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगितले की 3 वर्षे निवडणुकीसाठी आहेत, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. 3 वर्षांनंतरचे उमेदवार आतापासून ठरवले पाहिजे, संघटन बांधणी आतापासून केली पाहिजे. निवडणूक कोण लढणार याबद्दल निर्णय घेतला पाहिजे असा सल्ला संजूबाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धव ठाकरेंना दिला आहे. कारण उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाही, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. उबाठा गटातील दुफळी संजय राऊतांनी जो उबाठाला घरचा आहेर दिला त्यावरुन दिसून येते. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे. म्हणून कोणतीही निवडणूक नसताना देवाभाऊंच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मविआने केवळ आश्वासन दिले आणि घरात बसून कारभार केला. ‘संकटमोचक’ रस्त्यावर, तर तुमचे नेते ‘घरकोंबडे नवनाथ बन म्हणाले की, संकटमोचक रस्त्यावर उतरतात, शेतकऱ्यांमध्ये जातात त्यांची कामे करतात. तुमचे नेते कुठे आहेत? तुम्ही घरकोंबडा म्हणून काम करतात. ते जळगावमध्ये जात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे जाणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार का? मागच्या वेळी तुम्ही पाहणी करायला गेले आणि ड्रायफ्रुटस खात बसले. संकटमोचकावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही ते जनतेमधील नेते आहेत. राऊत एक काय ते ठरवा नवनाथ बन म्हणाले की, जळगावमध्ये उबाठाची गुंडगिरी सुरू आहे. संदीप कर्णिक नावाचे अधिकारी चांगले काम करतात म्हणतात नेमके एकच काही तरी सांगा. कुणाच्या दरबारात कोण जात होते हे राऊतांनी सांगू नये. खरातचे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्याची हिंमत देवाभाऊंनी केली. भाजप सरकार कोणतेही चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालत नाही. उद्धव ठाकरे सरकारने वाझे सारख्या खंडणी वसूल करणाऱ्यालादेखील समर्थन केले आहे. मविआत समन्वय नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस परस्पर उमेदवार देणार असे जाहीर करते. त्यांच्यामध्ये समन्वय नाही. हे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. संजय राऊत हे शरद पवारांची प्रवक्तेगिरी करत राहुरीवर शरद पवारांचा हक्क आहे सांगत आहेत. त्यांचे असे झाले आहे की मीठ उबाठाचे खायचे अन् काम शरद पवारांचे करायचे.
संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर:तीन वर्ष आधीच उमेदवार ठरवण्याचा राऊतांचा सल्ला, उबाठा गटातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर- नवनाथ बन
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
पात्र नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देणार:त्यांचा सक्रीय...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
पिंपरी बुद्रक वाळू घाटावर उत्खनन:कंत्राटदाराला ८५ लाखांच्या...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
लातूर हादरलं! क्लबमध्ये घुसून बंदुकीचा धडाका, तलवारींचा...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
‘मनाचे श्लोक’चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर परिणाम दिसतो:ठाकरे...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
नीलम गोऱ्हेंनी घेतली भोंदू खरातची भेट:सामाजिक कार्यकर्त्या...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
अशोक खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा:लेखिका...
1views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
कुटुंब रस्त्यावर, मी पार उद्धवस्त झालो!:माझ्यावर टार्गेट...
0views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 3, 2026
