नरसाळा येथे हरिपाठ स्पर्धेचे आयोजन

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भक्तिमय वातावरण

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील नरसाळा ग्रामवासी व कृष्णकुंज हरिपाठ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भव्य हरिपाठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी हनुमान देवस्थानाच्या प्रांगणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. १६,०००, रु. १४,००० व रु. १२,००० अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच चौथे ते सहावे क्रमांकासाठीही रु. १०,०००, रु. ७,००० व रु. ५,००० अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट वादक, गायक व संयोजनासाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. ५०० असून, नोंदणीची अंतिम वेळ रात्री १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. उशिरा नोंदणी करणाऱ्यांसाठी लेट फी रु. ७०० निश्चित करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. परीक्षक म्हणून क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून, कार्यक्रमात मोठ्या संख्येने हरिभक्त सहभागी होणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!