Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विहिरीत उडी घेऊन 36 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या


मांगरूळ येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

गावाजवळील एका शेतातील विहिरीत उडी घेऊन एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ येथे घडली.गोपाल मधुकर ठाकरे वय 36 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील राहिवासी होता.

गोपाल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. गोपाल हा वडिलांना त्यांच्या शेतीच्या कामामध्ये मदत करीत होता. व स्टाईलचे मिस्त्री काम करत होता.आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोज रविवारला 3 वाजताच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मृतक गोपाल यांचे पश्चात आई, वडील, पत्नी ,मुलगी व चार विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंतत्याचा मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली ए.एस.आय किसन शुंकुरवार करीत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!