ब्रेकिंग न्यूज
मॅट्रिमोनी साईटवर ओळख; लग्नाची स्वप्नं…महिलेला भेटायला फ्रान्समधून पुण्यात आला, पण एअरपोर्टवरच इतकं मोठं … रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेचा संकल्प; शिवसेना उबाठाचे वणीतील कौटुंबिक स्नेहमिलन उत्साहात 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? फक्त 3 सोप्या स्टेप्स वापरून पाहा CRIME : भेटायला बोलवून किडनॅप अन् झाडाला बांधून जिवंत जाळलं; 28 वर्षाच्या इन्स्टाग्राम रीलस्टार तरुणीचा दुर… Navnath Ban Vs Amey Ghole News | नवनाथ बन आणि अमेय घोलेंमध्ये जुंपली | News18 Marathi Anaya Bangar : ऑस्ट्रेलियाकडून संधी मिळताच अनाया बांगरने BCCI वर व्यक्त केली नाराजी! पुरूषाची स्त्री झाली प… अल्पवयीन पोरं, शिकवतो म्हणून मुंबईला आणलं अन् नरकात ढकललं, पैशांसाठी बाप आणि आत्याचं भयानक कृत्य पोलीस बांधवांना राखी बांधून महिला सुरक्षेचा दिला संदेश मराठमोळ्या सचिनच्या घरी ओणमचं सेलिब्रेशन, अख्खं तेंडुलकर कुटुंब जमलं, पण एका गेस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं! भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …
SP News Maregaon

खरीपाच्या पेरण्यांना ब्रेक; 6.74 लाख हेक्टरपैकी फक्त 2.89% क्षेत्रावर पेरणी:11 वर्षांतील जूनमधील सर्वात कमी पावसाचा फटका‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात मान्सून लांबल्याचा सर्वाधिक फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसला आहे. जूनचे २६ दिवस उलटूनही जिल्ह्यात केवळ ४१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना अक्षरशः ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १९ हजार ४६८.९२ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या २.८९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्या ११ वर्षांतील हा जूनच्या २६ दिवसांतील सर्वात कमी पाऊस ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. यंदा मात्र पहिला समाधानकारक मान्सूनचा पाऊस २२ जूनला झाला. त्यानंतरही सर्वदूर पाऊस न झाल्याने जमिनीत आवश्यक ओल निर्माण झाली नाही. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवली आहे. गेल्या वर्षी परिस्थिती याच्या नेमकी उलट होती. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे २६ जूनअखेर सुमारे तीन लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हा वेग पूर्णपणे मंदावला आहे. गेल्या ११ वर्षांच्या नोंदीतही यंदाची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. २६ जूनअखेर उर्वरित पान ४ जमिनीत ७ इंच ओलशिवाय पेरण्या कदापि करू नका ^ भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात पुढच्या चार दिवसात हलका व मध्यम पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस हा पेरण्यासाठी पुरेसा नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यासाठी घाई करू नये. जोपर्यंत जमिनीत ७ इंच ओल तयार होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. गेल्या वर्षी परिस्थिती एकदम उलट होती. मे महिन्यात झालेल्या तब्बल २२० मिमी अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे १ जूनपासूनच खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आणि २६ जूनअखेर सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पावसाने हुलकावणी दिल्याने जमिनीत आवश्यक ओल तयार झाली नाही. परिणामी २७ जूनअखेर ३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होतील, हा कृषी विभागाचा अंदाजही फोल ठरला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर