बातमी ऐका (Marathi Voice Reader)
लग्नसमारंभ, हळदी आणि इतर मंगल प्रसंगांमध्ये आयोजकांकडून होणाऱ्या अक्षम्य विलंबामुळे फोटोग्राफी व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, शेवगाव येथील बैठकीत तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बदलत्या काळातील आव्हाने, वाढती स्पर्धा आणि वेळेची अनियमितता यावर या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. सकाळी बोलावून कार्यक्रम दुपारी सुरू होणे किंवा सायंकाळी बोलावून रात्री उशिरापर्यंत लांबणे, यामुळे फोटोग्राफर्सचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. समाजाने आमच्या वेळेचा आदर करावा ^”आम्ही फक्त फोटो काढत नाही, तर लोकांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जपतो. मात्र कार्यक्रमांच्या वेळा पाळल्या न गेल्याने तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा परिणाम आमच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक आयुष्यावर होतो. महागाईमुळे आधुनिक साहित्य खरेदी करणे कठीण झाले असले, तरी आम्ही उत्तम सेवा देतो. समाजानेही आमच्या श्रमाचा व वेळेचा आदर करावा.” -राम नाईक, फोटोग्राफर, शेवगाव.