केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने बुधवार दि. २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “चुल्हा जलाओ” आंदोलन केले. देशातील ६२५ जिल्ह्यांत सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून, वाढती महागाई, स्मार्ट मीटर, गॅस टंचाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला.या आंदोलनात महिलांनी लाकडाच्या मोळ्या आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक केला. “आज गॅस महाग झाला, उद्या गॅस मिळणंच बंद झालं तर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल,” असा इशारा महिलांनी सरकारला दिला. आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरला “जनतेची आर्थिक लूट करणारे साधन” म्हणत तीव्र निषेध नोंदवला. स्मार्ट मीटरमुळे वाढते वीज बिल, वीजपुरवठा नसतानाही येणारी बिले, खासगी कंपन्यांची मनमानी आणि बेरोजगारी याविरोधात सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने तात्काळ स्मार्ट मीटर बंद करून पारदर्शक मीटर बसवावेत, घरगुती गॅस ४०० रुपयांत, कॉमर्शियल गॅस ७०० रुपयांत, पेट्रोल ९० रुपये आणि डिझेल ८० रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनाचे वेळी यवतमाळ-वाशीम बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी केले. या वेळी ज्योती शामकुंवर, अशोक भोयर, भुवन मुनेश्वर, सुनिल गवई, प्रशांत मुनेश्वर, अॅड. रोशना आडे, विलास भोयर, गजानन गोडवे, करन खंडारे, मिलिंद बडशे, शुभांगी मेश्राम, प्रिती गवई, वैशाली मेश्राम, वनिता मेश्राम, आरती मुधाने, लिना मेश्राम, ज्योती कांबळे, शीला भोवते उपस्थित होते.