ब्रेकिंग न्यूज
News 18 Marathi Headlines | 21 Aug | 9 AM | Kurla-Trombay Railway News | Auto Taxi Fare Price News सोशल मीडियावर फोटो पाहिला, गायिकेला फोन केला, जेवायला बोलावलं अन्…, कोल्हापूरच्या तरुणाचं भयंकर कांड Virender Sehwag Son : जसा बाप तसा बेटा! सेहवागच्या लेकाचा धमाका, सेम टू सेम कव्हर ड्राईव्ह; 157 च्या स्ट्रा… मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील गोसाई विठुजी कापसे यांचे निधन Jalgaon Crime News | नशिराबादमध्ये पोलिसाच्या घरात सशस्त्र दरोडा | Police Naik Ganesh Koli कमी खर्चात शेतीतून मिळेल भरघोस उत्पन्न, जमिनीच आरोग्य जपण्यासाठी 3 गोष्टी कराच, Video अवघ्या 5 वर्षांची चिमुकली, स्वातंत्र्यदिन कार्यक्रमावरून घरी आली, रिक्षावाल्यानं चॉकलेट दिलं अन्… भयंकर क… Eknath Shinde: कुणबी जात प्रमाणपत्राचा शिंदे गटाला फटका! जातप्रमाणपत्र बोगस आढळल्यानं नगरसेविकेची निवड रद… मारेगावात महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लग्नानंतर सगळं सुरुळीत होतं, पण पतीची भयंकर डिमांड, विवाहितेनं…, छ. संभाजीनगर हादरलं!
SP News Maregaon

तात्पुरता दिलासा:जीवघेण्या उकाड्यानंतर पावसाच्या सरी, दहा ते पंधरा मिनीटाच्या पावसाने अनेक भागात वीज खंडित‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तब्बल महिनाभराच्या जीवघेण्या उकाड्यानंतर आज अमरावतीकरांना पावसाने तात्पुरता दिलासा दिला खरा, पण त्याचसोबत महावितरणच्या ‘ढिसाळ’ कारभाराचे वाभाडेही काढले आहेत. मंगळवारी (दि. २६) दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरात जवळपास सर्वच भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, केवळ १० ते १५ मिनिटे पडलेल्या या पहिल्याच पावसाने महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून शहरातल्या अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. मागील काही दिवसांपासून अमरावती शहर जणू उष्णतेच्या भट्टीत भाजून निघत होते. नागरिक जीवघेण्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. सोमवारी दुपारी शहरातल्या एक-दोन भागांत पावसाचे तुरळक थेंब पडले खरे, परंतु तो पाऊस अत्यंत अल्प असल्याने नागरिकांना उकाड्यापासून अजिबात दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे आज, मंगळवारी सर्वच भागांत कोसळलेला हा पाऊस महिनाभराच्या तीव्र उष्णतेनंतरचा ‘पहिला तात्त्पुरता दिलासादायक पाऊस’ ठरला. या पावसाने हवेत काही काळासाठी गारवा निर्माण केला आणि अमरावतीकरांनी तब्बल तीन आठवड्यानंतर दुपारच्यावेळी रस्त्यांवर काही क्षणासाठी का होईना गारव्याचा अनुभव घेतला होता. मान्सूनपूर्व नियोजन चर्चेपुरतेच केवळ १५ मिनिटांच्या सामान्य पावसाचा ताणही सहन न करू शकणारी यंत्रणा घेऊन महावितरण आगामी मान्सूनला कसे तोंड देणार, हा मोठा प्रश्न आहे. पहिल्याच पावसात उडालेला हा गोंधळ पाहता, महावितरणचे मान्सूनपूर्व नियोजन केवळ चर्चेपुरतेच आहे का? असा सवाल अमरावतीकरांसमोर आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर