ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

काँग्रेसच्या ट्रॅक्टर-डबकी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले:कृत्रिम खत टंचाई, बोगस बियाणे, पीक विम्याचा मुद्दा गाजला‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकऱ्यांची लूट थांबवा…, बोगस बियाणे विकणाऱ्यांना जेलमध्ये टाका…, रात्रीची वीज बंद करा, दिवसा वीज द्या… अशा गगनभेदी घोषणा, ट्रॅक्टर्सचा धडधडाट आणि डबक्यांचा (ढोल) कडकडाट करत मंगळवारी यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक आणि आक्रमक ‘ट्रॅक्टर-डबकी मोर्चा’ काढण्यात आला. खरीप हंगाम तोंडावर असतानाही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनाने संपूर्ण यवतमाळ शहराचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस आणि सर्व आघाड्यांच्या वतीने आयोजित या मोर्चाची सुरुवात शहरातील मेडिकल चौक (दोन पंजा) येथून झाली. ट्रॅक्टर्ससह आंदोलक रस्त्यावर उतरल्याने लाठीवाला पेट्रोल पंप, संविधान चौक, दत्त चौक ते महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हा संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. हातात पक्षाचे झेंडे आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन हजारो शेतकरी आणि तरुण या मोर्चात ताकदीने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचे उर्वरित. पान ४ शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित डीएपी, युरियाची टंचाई दूर करून पुरवठा सुरळीत करा, बोगस खते, बियाणे,कीटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांवर कारवाई करा, सोयाबीन, कापूस, तुरीचा पीक विमा मंजूर करा कॅनमध्ये डिझेल देण्यावरील अटी रद्द करा रात्रीची वीज बंद करून दिवसा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करा. शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल ^राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. खरीप हंगाम सुरू होत आहे, पण शेतकरी अजूनही बियाणे आणि खतांसाठी वणवण भटकत आहे. सरकारने ही सुस्तपणाची भूमिका न सोडल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. – शिवाजीराव मोघे, माजी मंत्री.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर