शेतकऱ्यांची लूट थांबवा…, बोगस बियाणे विकणाऱ्यांना जेलमध्ये टाका…, रात्रीची वीज बंद करा, दिवसा वीज द्या… अशा गगनभेदी घोषणा, ट्रॅक्टर्सचा धडधडाट आणि डबक्यांचा (ढोल) कडकडाट करत मंगळवारी यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक आणि आक्रमक ‘ट्रॅक्टर-डबकी मोर्चा’ काढण्यात आला. खरीप हंगाम तोंडावर असतानाही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनाने संपूर्ण यवतमाळ शहराचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीमुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस आणि सर्व आघाड्यांच्या वतीने आयोजित या मोर्चाची सुरुवात शहरातील मेडिकल चौक (दोन पंजा) येथून झाली. ट्रॅक्टर्ससह आंदोलक रस्त्यावर उतरल्याने लाठीवाला पेट्रोल पंप, संविधान चौक, दत्त चौक ते महात्मा ज्योतिबा फुले स्मारक हा संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाला होता. हातात पक्षाचे झेंडे आणि सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन हजारो शेतकरी आणि तरुण या मोर्चात ताकदीने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचे उर्वरित. पान ४ शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित डीएपी, युरियाची टंचाई दूर करून पुरवठा सुरळीत करा, बोगस खते, बियाणे,कीटकनाशक कंपन्या, विक्रेत्यांवर कारवाई करा, सोयाबीन, कापूस, तुरीचा पीक विमा मंजूर करा कॅनमध्ये डिझेल देण्यावरील अटी रद्द करा रात्रीची वीज बंद करून दिवसा सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करा. शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल ^राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. खरीप हंगाम सुरू होत आहे, पण शेतकरी अजूनही बियाणे आणि खतांसाठी वणवण भटकत आहे. सरकारने ही सुस्तपणाची भूमिका न सोडल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. – शिवाजीराव मोघे, माजी मंत्री.