दारव्हा एसटी आगारात महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा:ग्रामीण-शहरी प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प‎

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७८ व्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एसटीच्या समृद्ध परंपरेचे स्मरण करत भविष्यातही प्रवाशांना अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यापार आणि सामाजिक संपर्क यांसाठी राज्यातील नागरिकांचा एसटीवर असलेला विश्वास कायम असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केला. “प्रवाशांची सेवा हीच आमची बांधिलकी” या ध्येयवाक्याला अनुसरून एसटी महामंडळाने राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एसटीने सातत्याने पार पाडले असून, अनेक पिढ्यांच्या आठवणींशी एसटीचे नाते जोडले गेले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात दारव्हा आगाराचे आगार व्यवस्थापक नितीन झाडे, कार्यशाळा अधीक्षक निकेश उघडे, वाहतूक अधीक्षक बाळकृष्ण मेश्राम, वाहतूक निरीक्षक सोनाली पवार, वाहतूक नियंत्रक भारती ढाले, कैलास धोटे, राजेश कारमोरे, वरिष्ठ लिपिक उमेश चव्हाण, लिपिक पवन इंगळे व प्रकाश काळे यांच्यासह आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाहक सवणे, मिर्झा, पवार, बाखडे, पेठे आणि सिंहे यांनीही एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सेवेत सातत्याने सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. एसटी महामंडळाची ७८ वर्षांची वाटचाल ही केवळ प्रवासी वाहतुकीची कथा नसून महाराष्ट्राच्या विकास, प्रगती आणि लोकसेवेची प्रेरणादायी गाथा आहे. या गौरवशाली प्रवासाबद्दल अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी आनंद व्यक्त करत महामंडळाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!