Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये: कृषि विभागाचे आवाहन | बकरी ईदपूर्वी मारेगावात पोलिसांचा दमदार रूट | आशियाडमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक विजेते रणधीर यांचे निधन:5 ऑलिंपिक खेळांमध्ये नेमबाजी केली; OCA अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय | जनगणना करणारी महिला शिक्षिका अपघातात ठार:पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना; आतापर्यंत 4 शिक्षक ठार, शिक्षक संघटनांचा संताप | महायुतीचे जागावाटप ९९% पूर्ण:एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल – बावनकुळे
SP News Maregaon
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये: कृषि विभागाचे आवाहन

पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये: कृषि विभागाचे आवाहन

32 seconds पूर्वी · 1 min read

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात यावर्षी एकूण ४४७९० हे.क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यापैकी साधारणतः ३३३८० हे. क्षेत्र कापुस पिकाखाली, ५००० हे. क्षेत्र सोयाबीन पिकाचे, ६३६२ हे. क्षेत्र तूर पिकाचे व उर्वरीत क्षेत्रावर चारा, ज्वारी व इतर किरकोळ पिके पेरणी होण्याचा अंदाज आहे.गेल्यावर्षी सोयाबीन पिकाची घटलेली उत्पादकता पाहता यावर्षी सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात घट होऊन कापुस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांकरिता खरीप हंगाम सुखकर व यशस्वी व्हावा यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव मार्फत गावोगावी खरीप हंगाम पूर्व नियोजन गावबैठका,उगवणक्षमता तपासणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिके इ. मोहिमा सुरू आहेत.पुरेसा म्हणजेच ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय साधारणतः ४ ते ६ इंच जमीन ओली झाल्याशिवाय पेरणी करु नये.

तसेच पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासून व बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.यावर्षी मान्सूनवर एल निनो चा प्रभाव बघता पेरणी करतांना उताराला आडवी तसेच रुंद सरी वरंबा किंवा बेडवर टोकन पद्धतीनेच करावी जेणेकरून मूलस्थानी जलसंधारण होऊन प्रतिकुल परिस्थितीत पिके तग धरतील. असे आवाहन प्र.तालुका कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!