रिकाम्या भूखंड स्वच्छतेची जबाबदारी मालकाची:दुर्लक्ष करणाऱ्यांवर होणार कारवाई, पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते निर्णय‎

यवतमाळ शहरात कुठल्याही परिसरात तुमचा भूखंड असेल आणि तो रिकामा पडुन असेल तर आता त्या मोकळ्या भूखंडाची स्वच्छता तुम्हाला स्वत: करावी लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भात नगरसेवक भारत ब्राम्हणकर यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असुन आता लवकरच या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता खुल्या भूखंडांच्या स्वच्छतेची जबाबदारी भूखंड मालकावर निश्चीत करण्यात आली आहे. आरोग्यासाठी धोका अनेक मोकळ्या भूखंडामध्ये अशा घाण पाण्याचे डबके साचलेले पहायला मिळतात. इतकेच नव्हे तर अनेक भूखंडांवर झाडे, झुडपे वाढलेली असतात. यामध्ये वराहांचा संचार असतो. एकंदरीतच असे मोकळे भूखंड अस्वच्छता पसरण्यासाठी कारणीभुत ठरत आहे. असे असताना त्या भुखंडावर भूखंड धारकास रहायला जायचे नसल्याने तो देखील त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो. ही बाब परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. स्वच्छतेचा खर्च व्याजासह वसुल करणे आवश्यक खुल्या भुखंडधारकांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी ठराविक कालावधीमध्ये भूखंडाची स्वच्छता करुन न घेतल्यास त्या भूखंडाची स्वच्छता पालिका प्रशासन करुन घेणार आहे. मात्र त्या कामासाठी येणारा खर्च व्याजासह संबंधीत भूखंड धारकाच्या मालमत्ता करामध्ये जोडुन वसुल करण्यात येणार आहे. त्यामुळे या बाबीकडे लक्ष न देणाऱ्यांना हा अतिरिक्त फटका सहन करावा लागणार आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारचे खुले भूखंड त्या भागातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारी ठरत असल्याने हा विषय सभेमध्ये मांडून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आता पालिकेने या नियमाची अंमलबजावणी सुरू करावा. भारत ब्राम्हणकर, नगरसेवक

Leave a Comment

error: Content is protected !!