तीस वर्षे लोटूनही मूलभूत समस्या कायम.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी १५ आगस्ट १९९२ साली झरी जामणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली . तीन दशक होऊनही तालुक्यातील रस्ते पाणी , विज , आरोग्य शिक्षण या मूलभूत समस्या सुटलेल्या नाही .
विकासाच्या नावावर करोडो रुपयाचा निधी खर्च केला जात असला तरी त्याच त्या समस्येसाठी तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .विकासासाठी रस्ता महत्त्वाचा आहे . परंतु संपूर्ण तालुक्यात काही मोजके रस्ते सोडले तर ६०% पेक्षा जास्त रस्ते अतिशय खराब आहे .दर्जेदार कामे करण्यात येत नसल्याने वारंवार त्याच कामासाठी वारंवार निधी खर्च होतांना दिसत आहे .

तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासह खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय स्थिती अतिशय खराब आहे . मागिल पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात मे महिन्या पर्यंत अनेक रस्त्यांची कामे होईल अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा होती परंतु उन्हाळा संपत आला तरी रस्त्याची कामे केली गेली नाही.फारशी कामे सुरु कुठे दिसत नाही.झरी -जामणी -सालेभट्टी हा ५ की.मी तसेच घोन्सा ते येसापूर फाट्यापर्यंत २ किमी रोड खडे पडले आहेत .
दरवर्षी खडे बुजविण्याच्या नावा खाली लाखो रुपये खर्च केले जात असले तरी मात्र दोन महिन्यांत त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत . मांगुर्ला बु., मांगुर्ला खु , सालोभट्टी – मार्की खु पाटण – झरी , खडकी – अडेगांव , चिंघाट – बोपापूर , मार्थाजून लांडगी – पोड , मार्थाजून – बिहाडीपोड , दाभाडी – वर्लासा इ. अनेक रोड संपूर्ण उखळे असून दुचाकी नाही पायदळ चालणे कठीण झाले आहे. गिट्टी उखडून रोडवरील डांबर नाहीसे झाले असून बैलगाडी घेवून जाताना बैलांच्या पायाला इजा होत असल्याचे सांगण्यात येत आहे .
अधिकारी व ठेकेदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे बोलले जाते. यामुळे अल्पावधीतच रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहे .
झरी – दाभाडी निमणी रोड चे २०२० जंगलात टप्पा डांबरी करण्यात आले परंतु कोणत्याही प्रकारची अवघड वाहतूक नसतांना दोन वर्षांत रस्ता खराब होत आहे .
रस्त्याच्या समस्येसाठी व निकृष्ट दर्जाच्या बांधकाम विरुद्ध अनेक राजकिय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिली.आंदोलन उपोषण करण्यात आली माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. मात्र चार पाच महीने झाली त्यांना विसर पडला असून या विषयी कोणीही पाठपुरावा करतांना दिसत नाही .

रस्त्याचा समस्या गंभीर असून खराब रस्त्यामुळे तालुक्यातील बस सेवा दोन वर्षा पासून बंद करण्यात आली आहे .त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.खाजगी वाहन खेड्यापाड्यात जायला तयार नसून गेले तरी दुप्पट तिप्पट भाडे घेतात . गरोदर स्त्री , आजारी व्यक्ती यांना दवाखाना दवाखान्यात घेऊन जाणे कठीण होत आहे . अपघात वाढले असून अनेकांना पाठीचे , माणेचे दुखणे सुरु झाले आहे .ग्रामीण भागातून शेतमाल नेणे त्रासदायकच असून ग्रामीण जनतेला खराब रस्त्यांमुळ आर्थिक भूर्दंड सोसावे लागत आहे .असे असले तरी जनतेच्या समस्येचा लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचे दिसून येत आहे .
“” प्रतिक्रिया “”
मागिल दोन वर्षा पासून सुरु असलेल्या झरी – शिबला – पांढरकवडा आणि मुकुटबन पाटण बोरी रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण ची कामे कासव गतीने सुरू असल्याने यंदाही पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करताना लोकांचे हाल होणार असल्याने चिन्ह दिसत आहे .
