Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

ग्राम विकासाकरीता हवे योग्य नियोजन
भास्कर पेरे.

मारेगाव येथे सरपंच मेळावा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील आखिल भारतीय सरपंच परिषद मारेगाव यांच्या वतीने सरपंच मेळाव्याचे आयोजन दिनांक 11 मे 2022 ला करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच ग्राम पंचायत पाटोदा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी सरपंचाची भुमिका कशी असावी हे विषद केले, तसेच योग्य नियोजन, जनतेशी संवाद, उत्पन्न वाढीचे साधने तयार करावीत, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शन केले.

यात सरपंच अरविंद ठाकरे यांनी विराजित खुर्चीवरून काम करतांना राजकिय हेवेदावे, विरोधक चुकीची माहिती देतात, प्राथमिक स्वरूपातील योजनांचा निधी अपुरा येत असल्याने विकासकामांना खिळ बसतो. शासकीय योजना राबवीत असताना प्रशासनातुन प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लाभधारकाला न्याय मिळत नाही. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती विकास कामापासून दुर राहिल्या आहेत, असे मनोगत या प्रसंगी व्यक्त केले आहेत.

सरपंच मेळाव्याला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, अनील देरकर, माजी प.स.सभापती शितल पोटे, कृउबास उपसभापती  नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, सरपंच अरविंद ठाकरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकर, भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे अँड. देव पाचभाई ,मारोती पाचभाई यासह तालुक्यातीलअसंख्य सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
 

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!