Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाग्यश्री रवींद्र क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी टीच्या भावाने माढा पोलिस ठाण्यात तिच्या पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भाग्यश्री यांचे 2011 साली विवाह झाला होता. लग्नानंतर पतीकडून दारूच्या नशेत मारहाण, शिवीगाळ, तसेच माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. घरातील उघड्या विद्युत तारांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का बसून आणि त्यानंतर खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन भाग्यश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात असल्याने, मृत भाग्यश्री यांचे पती आणि शिक्षक असलेले रवींद्र क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत असून, ही घटना केवळ एक अपघात आहे की यामागे काही कट आहे, याचे सत्य तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!