पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी भाषेबद्दल बोलतो ते लोकांसाठी बोलतो, पश्चातापाचा हाथ मारून काही फायदा नाही. सध्या भैय्यांना मराठी शिकवायचं चाललं आहे. भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील. महाराष्ट्रात राज्यकर्ते शाळा विकत चालले असतील तर तो शाळांचं जागेचा विषय आहे. मराठी माध्यमांचा शाळा ज्या जागेवर आहे तिथल्या जागांवर लक्ष आहे. आयपीएल मध्ये गुंतवून ठेवायचं, कुठेतरी कॉन्सर्ट मध्ये गुंतवून ठेवायचं पण सरकारला प्रश्न विचारू नका हे सध्या चित्र सुरू असल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पत्रकारितेतून मी आलो आहे. अनेक ठिकाणी मी काम केलं आहे. घरातच माझ्या ती गोष्ट होती. पत्रकारिता बदलली आहे, यात काही संशय नाही. तुम्ही किती गोष्टी दाखवा, किती लिहा पण सरकारला काही त्याचा फरक पडत नाही ही गोष्ट महत्त्वाची आहे असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. अनेक चांगले पत्रकार मंत्र्यांकडे काम करत आहेत. तुम्ही लिहित राहाल, बोलत राहाल पण त्याने सत्ता जाते सत्ता येते हा समज असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आत्ताची परिस्थिती दिसेल त्याची जमीन असा विषय सुरु आहे. आज पुण्याची अवस्था बघा. मूळ पुणे वेगळं, काही आकार उकार नाही. पुण्यात पाणी तुंबणार कारण कोणाचे लक्षच नाही. मुंबईत हजारो एकर जागा गोदरेजची आहे. सरकारी जमिनीवर अनधिकृत कामं कशी झाली? कुठल्याच नगरसेवकाला, आमदाराला आपलेपणाची भावना राहिली नाही. हावरटपणा आणि बजबजपुरी सुरु आहे. अदानी विषय मांडून पुढे काय झालं? पत्रकारांनी तो विषय का नाही धरुन लावला? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, सर्व पत्रकारांना सांगणे आहे की दबाव आला तर त्यांच्या बातम्या टाकने बंद करा. जिथे जमीन भुसभुशीत असतात तिथेच घुशी होतात, खडकात घुशी होत नाहीत असेही राज ठआकरे म्हणाले. संयुक्त महाराष्ट्र झाला तो म्हणजे 1 मे पण महाराष्ट्र दिन दिवशी मुंबईतल्या मराठी लोकांना बाहेर येऊन वंदन करण्याची जाणीव नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना ‘भैय्या’ दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र
-
By सुरेश पाचभाई
- April 29, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
विधान परिषद निवडणूक:अखेर काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा, मविआकडून...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर:154 विहिरींचे अधिग्रहण...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51,...
4views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 30, 2026
राहुरी, बारामतीत महायुतीचा ‘एकतर्फी’ करिश्मा:अक्षय कर्डिले अन्...
2views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- April 29, 2026
