ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

हटवांजरी येथे अज्ञात व्यक्तीने 1 एकर पऱ्हाटी उपटली.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

फुलोऱ्यावर आलेली कपाशीची झाडे उपटल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान.

हटवांजरी प्रतिनिधि:- रुपेश बोधाने

ऐन फुलोऱ्यात आलेली कपाशीची झाडे सरफिरूने उपटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन शेती हंगामाच्या मध्यात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. विकृत मानसिकतेतून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी किसन जानबा घोडाम यांचे कडे सुमारे 7 एकर शेती आहे. त्यांची शेती हटवांजरी ते बुरांडा रस्त्याच्या कडेला आहे. त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली होती. काल दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला नेहमी प्रमाणे ते शेतीची कामे आटोपून घरी गेले होते. आणि आज दिनांक 24 ऑगस्टला 2022 रोज बुधवारला सकाळी ते शेतामध्ये आले.

त्यावेळी त्यांना शेतातील सुमारे एक एकर शेतामधील कपाशीची झाडे उपटलेली दिसली. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. शेतीच्या ऐन बहाराच्या हंगामात शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.यावर्षी सुरुवातीला पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार – तिबर पेरणी करावी लागली होती.

त्या नंतर जुलै महिन्यात एवढा पाऊस पडला की, शेतकऱ्यांच्या शेतात सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. आणि त्यात शेतीचे असे अज्ञात सरफिरूने केलेले नुकसान पाहून शेतकरी मायबाप आता जगायचे कसे असा टाहो फोडतांना दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर